vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

‘कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

     रांची (झारखंड) प्रतिनिधी: नाशिक येथील एका नामांकित कंपनीत अनेक हिंदु महिला कर्मचाऱ्यांचे झालेले लैंगिक शोषण आणि छळ, ही केवळ नाशिकपुरती मर्यादित घटना नसून तो एका ‘कॉर्पोरेट जिहाद’चा व्यापक भाग असल्याचे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. या गंभीर विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने झारखंडचे राज्यपाल माननीय श्री. संतोष कुमार गंगवार यांची भेट घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्यपालांनी या विषयावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

    समितीचे पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी राज्यपालांना माहिती दिली की, नाशिकच्या घटनेने कॉर्पोरेट जगतातील एका धोकादायक षड्यंत्राचा पर्दाफाश केला आहे. तिथे हिंदु तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धा दुखावण्याचे संघटित प्रयत्न करण्यात आले. असे ‘स्लीपर सेल’ रांचीसह देशातील इतर मोठ्या शहरांमधील आयटी कंपन्यांमध्येही सक्रिय असू शकतात, ज्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे समितीचे मत आहे.     भेटीदरम्यान राज्यपाल म्हणाले की, ते या संपूर्ण प्रकरणाची माहिती आजच पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांना पाठवतील. या संपूर्ण प्रकरणाची ‘एनआयए’मार्फत (NIA) चौकशी करण्यात यावी आणि देशभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ‘विशेष सुरक्षा ऑडिट’ लागू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच, ज्या कंपन्या अशा राष्ट्रविरोधी कारवाया रोखण्यात अपयशी ठरत आहेत, त्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

 

संबंधित पोस्ट

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

आर्ट ऑफ लिविंग ने आयोजित केलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्ष पद भारताच्या माननीय राष्ट्रपती भूषवणार*

vishwatmaklokswamivarta

एमएसएमई ॲवार्ड 2026′ साठी विविध 9 प्रवर्गांमध्ये नामांकने आमंत्रित

कल्याणमध्ये इमारत दुर्घटनेत ६ मृत्यू, ४ जखमी..

vishwatmaklokswamivarta

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta