vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

‘कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

     रांची (झारखंड) प्रतिनिधी: नाशिक येथील एका नामांकित कंपनीत अनेक हिंदु महिला कर्मचाऱ्यांचे झालेले लैंगिक शोषण आणि छळ, ही केवळ नाशिकपुरती मर्यादित घटना नसून तो एका ‘कॉर्पोरेट जिहाद’चा व्यापक भाग असल्याचे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. या गंभीर विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने झारखंडचे राज्यपाल माननीय श्री. संतोष कुमार गंगवार यांची भेट घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्यपालांनी या विषयावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

    समितीचे पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी राज्यपालांना माहिती दिली की, नाशिकच्या घटनेने कॉर्पोरेट जगतातील एका धोकादायक षड्यंत्राचा पर्दाफाश केला आहे. तिथे हिंदु तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धा दुखावण्याचे संघटित प्रयत्न करण्यात आले. असे ‘स्लीपर सेल’ रांचीसह देशातील इतर मोठ्या शहरांमधील आयटी कंपन्यांमध्येही सक्रिय असू शकतात, ज्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे समितीचे मत आहे.     भेटीदरम्यान राज्यपाल म्हणाले की, ते या संपूर्ण प्रकरणाची माहिती आजच पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांना पाठवतील. या संपूर्ण प्रकरणाची ‘एनआयए’मार्फत (NIA) चौकशी करण्यात यावी आणि देशभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ‘विशेष सुरक्षा ऑडिट’ लागू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच, ज्या कंपन्या अशा राष्ट्रविरोधी कारवाया रोखण्यात अपयशी ठरत आहेत, त्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

 

संबंधित पोस्ट

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट

जालना येथे 27 मार्च रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा..

शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू