vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका;जिल्हा प्रशासनाचे आवाहन

तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका;जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींच्या मार्फत भूलथापा देऊन तलाठी निवडीचे आदेश देऊन फसवणूकीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासनाने अशा बनावट आदेशांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.सन २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर असे कोणतेही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा निवड समितीमार्फत देण्यात आलेले नाहीत,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे व टीसीएस कंपनीकडून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) भरती २०२३ करीता ऑगस्ट- सप्टेंबर २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत जिल्हा निवड समिती छत्रपती संभाजीनगर साठी १५४ पदांची जाहिरात देण्यात आली होती. निवड व प्रतिक्षा यादीत उमेदवारांची संख्या १५३ होती.त्यापैकी १४४ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कुणालही ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) निवडीचा कुठलाही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला नाही. तरी नागरिकांनी तलाठी पदभरती २०२३ ची मुदत संपल्याने अज्ञात व्यक्तिंच्या भुलथापांना बळी पडू नये. तलाठी पदभरती बाबत वस्तूनिष्ठ माहिती घेण्यासाठी अथवा तक्रार देण्यासाठी अभिप्राय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (संपर्क क्रमांक ०२४०-२९८८०७७) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एन्काऊंटर दोन दहशतवाद्यांचा खात्मा…

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार पाळण्याबाबतच्या शासनाने जारी केल्या सूचना…

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय-मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील  .

जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संवेदनशीलतेने विट्याच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान- जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात दात्यांचा मोलाचा हातभार- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतूनही मिळाले एक लाख पंच्याहत्तर हजार…

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक