vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठा, खरीप पेरणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत अधिकृत व अचूक वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.  असे केले आवाहन

लातूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठा, खरीप पेरणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत अधिकृत व अचूक वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.  असे केले आवाहन

राज्य प्रतिनिधी लातूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठा, खरीप पेरणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत अधिकृत व अचूक वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.  असे केले आवाहन

📊 प्रमुख ठळक मुद्दे:⛈️ पर्जन्यमान (Rainfall Status):जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७०६ मिमी असून, आजअखेर ११६ मिमी (१६%) पावसाची नोंद झाली आहे.  जूनच्या सर्वसाधारण १३५ मिमी तुलनेत ९५ मिमी (सुमारे ७०%) पाऊस पडल्याने जून महिना सामान्य राहिला आहे.

💧 पाणीसाठा (Water Storage):जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सध्या १७% पाणीसाठा शिल्लक आहे.  मांजरा प्रकल्प: १८.१३ % साठा (३२ दशलक्ष घनमीटर)  निम्न तेरणा प्रकल्प: ३३.१२ % साठा (३० दशलक्ष घनमीटर)  मध्यम प्रकल्प: १२.३८ % | लघु प्रकल्प: १२.५१ %  🌱 खरीप पेरणी अहवाल (Sowing Status):६ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १६% म्हणजेच सुमारे ९० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.  मुख्य पीक सोयाबीन असून, त्यापाठोपाठ तुराची लागवड सुरू आहे.

🚰 पाणी टंचाई उपाययोजना:टंचाईग्रस्त भागात ३ टँकर्स सुरू असून १८७ विहिरींचे संपादन करण्यात आले आहे.  म.न.पा. व न.पा. क्षेत्रात डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सुरक्षित उपलब्ध आहे! नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.  🌾 चारा उपलब्धता (Fodder Availability):पशुधनासाठी जिल्ह्यात १२३ दिवस (सुमारे ४ महिने) पुरेल इतका पुरेसा चारा साठा उपलब्ध आहे. पशुपालकांनी चिंतेचे कारण नाही.   जिल्हा प्रशासनाचे आवाहन:प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कृपया केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि पाणी व चाऱ्याचा अपव्यय टाळा!

0000

संबंधित पोस्ट

टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

नियोजनपूर्ण दर्जेदार कामांसाठी शासन आपल्या सोबत – उपमुख्यमंत्री अजित पवार

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम;राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

धनगर समाजाच्या हक्कासाठी निर्णायक टप्पा – अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन!- प्रमोद वाघमोडे