लातूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठा, खरीप पेरणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत अधिकृत व अचूक वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे केले आवाहन
लातूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठा, खरीप पेरणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत अधिकृत व अचूक वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे केले आवाहन
राज्य प्रतिनिधी लातूर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठा, खरीप पेरणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत अधिकृत व अचूक वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे केले आवाहन
📊 प्रमुख ठळक मुद्दे:⛈️ पर्जन्यमान (Rainfall Status):जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७०६ मिमी असून, आजअखेर ११६ मिमी (१६%) पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या सर्वसाधारण १३५ मिमी तुलनेत ९५ मिमी (सुमारे ७०%) पाऊस पडल्याने जून महिना सामान्य राहिला आहे.
💧 पाणीसाठा (Water Storage):जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून सध्या १७% पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा प्रकल्प: १८.१३ % साठा (३२ दशलक्ष घनमीटर) निम्न तेरणा प्रकल्प: ३३.१२ % साठा (३० दशलक्ष घनमीटर) मध्यम प्रकल्प: १२.३८ % | लघु प्रकल्प: १२.५१ % 🌱 खरीप पेरणी अहवाल (Sowing Status):६ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १६% म्हणजेच सुमारे ९० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मुख्य पीक सोयाबीन असून, त्यापाठोपाठ तुराची लागवड सुरू आहे.
🚰 पाणी टंचाई उपाययोजना:टंचाईग्रस्त भागात ३ टँकर्स सुरू असून १८७ विहिरींचे संपादन करण्यात आले आहे. म.न.पा. व न.पा. क्षेत्रात डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सुरक्षित उपलब्ध आहे! नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. 🌾 चारा उपलब्धता (Fodder Availability):पशुधनासाठी जिल्ह्यात १२३ दिवस (सुमारे ४ महिने) पुरेल इतका पुरेसा चारा साठा उपलब्ध आहे. पशुपालकांनी चिंतेचे कारण नाही. जिल्हा प्रशासनाचे आवाहन:प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कृपया केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि पाणी व चाऱ्याचा अपव्यय टाळा!