vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील बाल निरीक्षण गृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची एकूण २८८ पदे मंजूर असून त्यापैकी २१८ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना शासन निर्णयानुसार प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यानुसार दरमहा सुमारे ३९ लाख २४ हजार रुपयांचे मानधन अदा करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

 

 

विधानसभा सदस्य डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी याबाबत प्रश्न विचारला असता, मंत्री तटकरे म्हणाल्या की, सुरक्षा रक्षकांचे मानधन अदा करण्यापूर्वी संबंधित निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांकडून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र तयार केले जाते. त्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन ते आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येते. उपस्थितीची खातरजमा झाल्यानंतरच संबंधित सुरक्षा रक्षकांचे मानधन वितरित केले जाते.

सुरक्षा रक्षक हे प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दरात उपलब्ध होण्यास किंवा कार्य करण्यास इच्छुक नसल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन,शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- ॲड. निलेश हेलोंडे पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जालना जिल्हा दौरा

राज्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन