vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील बाल निरीक्षण गृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची एकूण २८८ पदे मंजूर असून त्यापैकी २१८ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना शासन निर्णयानुसार प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यानुसार दरमहा सुमारे ३९ लाख २४ हजार रुपयांचे मानधन अदा करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

 

 

विधानसभा सदस्य डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी याबाबत प्रश्न विचारला असता, मंत्री तटकरे म्हणाल्या की, सुरक्षा रक्षकांचे मानधन अदा करण्यापूर्वी संबंधित निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांकडून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र तयार केले जाते. त्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन ते आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येते. उपस्थितीची खातरजमा झाल्यानंतरच संबंधित सुरक्षा रक्षकांचे मानधन वितरित केले जाते.

सुरक्षा रक्षक हे प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दरात उपलब्ध होण्यास किंवा कार्य करण्यास इच्छुक नसल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी

महाविकास आघाडीला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; 40 कंपन्यांचा सहभाग,गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता..

जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात; नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील· विविध कार्यक्रमांचे आयोजन· उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणार· लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व अनुदान वाटप होणार

कानिफनाथ महाराज देवस्थान प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाची वक्फ बोर्ड व मुसलमान गटांना कारणे दाखवा नोटीस !हिंदू धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..