vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, दि. ९ : शहरी गरिबांना मूलभूत सेवा पुरविणे (बीएसयूपी) या उपक्रमांतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ४१३६ लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यात आली होती. मौजी काशी येथे तीन इमारतींचे बांधकाम पूर्ण करून ६७३ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित तीन इमारतींचे बांधकाम महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या माध्यमातून लवकरच उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक–खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्याबाबत महानगरपालिकेने प्रस्ताव सादर केल्यास शासन त्यास मंजुरी देईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

 

शहरी गरीबांना मूलभूत सेवा पुरविणे (बीएसयूपी) या उपक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात सदस्य नरेंद्र मेहता यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

 

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियान अंतर्गत शहरी गरिबांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीएसयूपी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जनतानगर आणि काशी चर्च या दोन झोपडपट्ट्यांतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केला असून, या प्रकल्पाअंतर्गत ४ हजार १३६ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

प्रकल्पातील एकूण ४,१३६ सदनिकांपैकी २,१६० सदनिकांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. उर्वरित १,९७६ झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठीच्या सदनिकांचे बांधकाम सार्वजनिक–खासगी भागीदारी तत्त्वावर केल्यास महानगरपालिकेची मोठ्याप्रमाणात आर्थिक बचत होऊ शकते.

 

यासंदर्भात नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सार्वजनिक–खासगी भागीदारी धोरण, २०२६ चा सखोल अभ्यास करून बीएसयूपी प्रकल्पातील उर्वरित १,९७६ लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाबाबत महानगरपालिकेचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. तसेच महसूल विभागाने उपस्थित केलेले मुद्देही प्रामुख्याने पीपीपी धोरणाशी संबंधित असल्याने त्याबाबतही मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. संबंधित अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पीपीपी धोरणानुसार उर्वरित १,९७६ लाभार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

०००

संबंधित पोस्ट

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्रतापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी..

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.

जालना शहरातील मस्तगड परिसरातील युवकांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

रेल्वे मंत्रालयानं लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडयांच्या तिकीटात किंचित दरवाढ केली असून,नवे दर आज पासून लागू होणार.

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

vishwatmaklokswamivarta

रणवीर अल्लाबदिया, समय रैना यांच्याविरुद्ध असभ्य वक्तव्यावरून एफआयआर केल्यानंतर आसाम पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले

vishwatmaklokswamivarta