vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

            जालना, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या वतीने दि. 13 जुलै 2026, सोमवार रोजी महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

            सदर कार्यक्रम गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास अनिल तलरेजा, अध्यक्ष, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार समिती, जालना यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

         या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, करिअर समुपदेशन, रोजगार मेळावे, कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाबाबत मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यास चालना मिळणार आहे.

   कार्यक्रमादरम्यान जालना जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य/प्लेसमेंट अधिकारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, कौशल्यवृद्धीसाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनासोबत समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ता जाधव यांनी केल  सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी विशाल येवले तसेच अमोल बोरकर, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास काळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे व गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन… जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल-भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..शिवसेनेच्या घोषणेने परिसर दणाणला..

vishwatmaklokswamivarta