केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला…
नवी दिल्ली प्रतिनिधी –
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
अभियांत्रिकी, कायदा, विज्ञान, डेटा सायन्स, जैववैद्यकीय विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले हे प्रशिक्षणार्थी सध्या दिल्ली-एनसीआरमधील भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये ऑन-द-जॉब प्रशिक्षण घेत आहेत.निर्मला सीतारामन यांनी प्रशिक्षणार्थींना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि व्यावसायिकतेची सर्वोच्च मानके जपण्याचे आवाहन केले. तसेच, सुलभ नियमपालनाच्या माध्यमातून ‘Ease of Doing Business’ आणि ‘Ease of Living’ ला चालना देत उत्तरदायी व पारदर्शक प्रशासन मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी अर्थपूर्ण योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना केले.