vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त…

 विदेश प्रतिनिधी

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांप्रती भारताने सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच, खलाशांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा आणि हिंसाचाराचा भारताने तीव्र निषेध केला आहे.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हिंसाचार तात्काळ थांबवून शांतता, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याच्या हितासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

 दरम्यान

आम्ही इराणच्या उप-राजदूतावास प्रमुखांना बोलावून एक निवेदन जारी केले असून या घटनेचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भारतीय जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

या प्रकरणी भारताने इराणकडे तीव्र निषेध नोंदवत अशा हल्ल्यांना तात्काळ पूर्णविराम देण्याची मागणी केली आहे. तसेच, तणाव कमी करून संबंधित दोन्ही पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारावा, जेणेकरून पश्चिम आशियात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

नवी मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर कोणताही हिंसाचार खपवून न घेण्याच्या पोलिस प्रशासन आणि सशस्त्र दलांना सूचना.

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती