vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त…

 विदेश प्रतिनिधी

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांप्रती भारताने सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच, खलाशांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा आणि हिंसाचाराचा भारताने तीव्र निषेध केला आहे.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हिंसाचार तात्काळ थांबवून शांतता, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याच्या हितासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

 दरम्यान

आम्ही इराणच्या उप-राजदूतावास प्रमुखांना बोलावून एक निवेदन जारी केले असून या घटनेचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भारतीय जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

या प्रकरणी भारताने इराणकडे तीव्र निषेध नोंदवत अशा हल्ल्यांना तात्काळ पूर्णविराम देण्याची मागणी केली आहे. तसेच, तणाव कमी करून संबंधित दोन्ही पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारावा, जेणेकरून पश्चिम आशियात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात

vishwatmaklokswamivarta

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta