vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त…

 विदेश प्रतिनिधी

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांप्रती भारताने सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच, खलाशांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा आणि हिंसाचाराचा भारताने तीव्र निषेध केला आहे.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हिंसाचार तात्काळ थांबवून शांतता, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याच्या हितासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

 दरम्यान

आम्ही इराणच्या उप-राजदूतावास प्रमुखांना बोलावून एक निवेदन जारी केले असून या घटनेचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भारतीय जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

या प्रकरणी भारताने इराणकडे तीव्र निषेध नोंदवत अशा हल्ल्यांना तात्काळ पूर्णविराम देण्याची मागणी केली आहे. तसेच, तणाव कमी करून संबंधित दोन्ही पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारावा, जेणेकरून पश्चिम आशियात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील -जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीशकुमार यांची आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड तर उद्या दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतील.

vishwatmaklokswamivarta

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद..

1 जून  ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

vishwatmaklokswamivarta

अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*प्रधानमंत्री मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही*