vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त…

 विदेश प्रतिनिधी

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांप्रती भारताने सखोल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच, खलाशांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा आणि हिंसाचाराचा भारताने तीव्र निषेध केला आहे.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हिंसाचार तात्काळ थांबवून शांतता, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याच्या हितासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

 दरम्यान

आम्ही इराणच्या उप-राजदूतावास प्रमुखांना बोलावून एक निवेदन जारी केले असून या घटनेचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक भारतीय जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

या प्रकरणी भारताने इराणकडे तीव्र निषेध नोंदवत अशा हल्ल्यांना तात्काळ पूर्णविराम देण्याची मागणी केली आहे. तसेच, तणाव कमी करून संबंधित दोन्ही पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारावा, जेणेकरून पश्चिम आशियात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू- शालेय शिक्षण विभागाची माहिती –

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस !  सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….

मराठवाडा पाणी परिषद पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी