vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

 बुलढाणा, प्रतिनिधी : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 व्या हप्त्याचा लाभ लवकरच वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 99 शेतकऱ्यांची ई केवायसी आणि 4 हजार 433 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन कृषि उपसंचालक अनुराधा गांवडे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे, नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजे लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

000000०००

संबंधित पोस्ट

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता,पार्किंग, वाहतुक बदल व सभेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण..

मतमोजणीचे कार्य जबाबदारीने पार पाडावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक  यांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता 4 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी 9 वाजता सुरू होण्याची वेळ न पाळणाऱ्या शाळांना कारवाईचा इशारा..

vishwatmaklokswamivarta