vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी  :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील युवक-युवतींना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने लोकशाहीर अण्णाभाऊ शिष्यवृत्ती योजाना राबविण्यात येत आहे. इ.१० वी, इ.12 वी, पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 60% पेक्षा जास्त गुण घेऊन उतीर्ण झालेल्या विध्यार्थी-विध्यार्थिनीना गुणानुक्रमे निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत.

शिष्यवृत्तीसाठी अर्जासोबत साध्या कागदावर जिल्हा व्यवस्थापक सातारा याचे नाव अर्ज, पासपोर्ट साईज फोटोसह), गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, आधार कार्ड व पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहेत.

शिष्यवृत्तीचे अर्जासाठी व अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ ला मजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, २२ अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट पुलाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र वाघमारे यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

दारुखाना येथे मुंबई पोर्ट ऑथॉरिटीची सक्तीची कारवाई; शेकडो झोपडपट्टीवासीयांवर बेघर होण्याची टांगती तलवार

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.

vishwatmaklokswamivarta

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय ! सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना, 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण..

vishwatmaklokswamivarta