
मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा प्रतिनिधी :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील युवक-युवतींना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने लोकशाहीर अण्णाभाऊ शिष्यवृत्ती योजाना राबविण्यात येत आहे. इ.१० वी, इ.12 वी, पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 60% पेक्षा जास्त गुण घेऊन उतीर्ण झालेल्या विध्यार्थी-विध्यार्थिनीना गुणानुक्रमे निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत.
शिष्यवृत्तीसाठी अर्जासोबत साध्या कागदावर जिल्हा व्यवस्थापक सातारा याचे नाव अर्ज, पासपोर्ट साईज फोटोसह), गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, आधार कार्ड व पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहेत.
शिष्यवृत्तीचे अर्जासाठी व अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ ला मजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, २२ अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट पुलाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र वाघमारे यांनी केले आहे.



