vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे व पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युद्ध विधवा आणि त्यांच्या अधीन असलेल्या पालकांसाठी (मुलामुलींसाठी) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत, ज्या पालकांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शालांत परीक्षा (इयत्ता १० वी), उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी), डिप्लोमा तसेच पदवी परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे आणि जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पुढील उच्च शिक्षण घेत आहेत, असे पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.

अर्जाबाबत महत्त्वाची माहिती: अर्जाची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२६, अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे. अधिक संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक: ०२२-४५६४१५९३ / ९९२००१६५८०.

तरी सर्व पात्र माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबातील संबंधित सदस्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि निश्चित मुदतीपूर्वी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेन्द्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज घाना इथं रवाना.

सामान्य नागरिकांना लवकर न्यायमिळण्यासाठीआवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते-ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न…

पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत

vishwatmaklokswamivarta

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात, ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर…

vishwatmaklokswamivarta

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी*

vishwatmaklokswamivarta