vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणू उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणू उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री शंभूराज देसाई

 

सातारा द प्रतिनिधी:- सातारा जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित आहे. तरी उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. त्यांच्या पाठीशी शासनासह प्रशासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली

हॉटेल फर्न रेसिडेन्सी, सातारा येथे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा उ‌द्योग केंद्राचे सहायक आयुक्त उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात नवनवीन उद्योग यावे यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सातारा, तासवडे, खंडाळा या ठिकाणी मोठे उद्योग आहेत. येथील उद्योगजकांना काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा

नागरिकांच्या हाताला काम देणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचे ध्येय आहे. उद्योजकांनी सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

0000

 

संबंधित पोस्ट

शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार  – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,छत्रपती संभाजीनगर विभागातील आयडॉल शिक्षकांशी संवाद नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती,मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पुरस्काराने शाळांचा गौरव…

राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींविरोधात सायन-कोळीवाडा येथे हजारो कार्यकर्ते सहभागी …

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन