vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी…

      जालना प्रतिनिधी:- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. या कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर येथील नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार असुन मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी तसेच निवडणुक प्रक्रिया मुक्त व शांततामय मार्गाने होणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकारी, जालना यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान झालेल्या अधिकारानुसार जालना जिल्ह्यातील नगरपरिषद निर्वाचन क्षेत्रातील सर्व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्त्यांचे (सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4 आणि एफएलबीआर-2) व्यवहार दि.1 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी संपुर्ण दिवस, दि. 2 डिसेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी आणि दि.3 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण दिवस पुर्णत: बंद ठेवावी. असे आदेश जिल्हाधिकारी, जालना यांनी जारी केले आहेत

संबंधित पोस्ट

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार! व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांचा शब्द; जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक पत्रकारांना मिळाले विम्याचे गिफ्ट…

vishwatmaklokswamivarta

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा रोजगार देणारे व्हा-कुलगुरु डॉ.फुलारी कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख**‘कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम*

vishwatmaklokswamivarta

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*