
‘द काश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले – विनाकारण वाद निर्माण करणे योग्य नाही..
मुंबई प्रतिनिधी
नाना पाटेकर म्हणतात देशात शांततेचे वातावरण आहे. येथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात, त्यामुळे विनाकारण गोंधळ घालणे योग्य नाही. इतकेच नाही तर ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून समाजाचे दोन तुकडे होईल आणि अशा प्रकारे तेढ निर्माण करणेही योग्य नाही.
विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir File) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत असतानाच हा चित्रपटही वादात सापडला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर बोलतो, पण एकतर्फी कथा सांगून वेगळेच वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नाना पाटेकर म्हणाले की, देशात शांततेचे वातावरण आहे. येथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात, त्यामुळे विनाकारण गोंधळ घालणे योग्य नाही. इतकेच नाही तर ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून समाजाचे दोन तुकडे होईल आणि अशा प्रकारे तेढ निर्माण करणे योग्य नाही, असे सोप्या शब्दात नाना पाटेकर म्हणाले.
चित्रपट पाहिल्यानंतर समाजात फूट पडेल’
नाना पाटेकर म्हणाले, ‘भारतातील हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी रहिवासी आहेत. दोन्ही समुदायांनी शांततेत राहणे आवश्यक आहे. दोन्ही समाजाला एकमेकांची गरज आहे. दोघेही समाजात एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत कोणत्याही एका चित्रपटावरून वाद निर्माण करणे योग्य नाही. सर्व जनता शांततेत जगत असताना असा गोंधळ घालणे योग्य नाही. जे हे करत आहेत त्यांना जाब विचारायला हवा. चित्रपट पाहिल्यानंतर समाजात दोन तुकडे पडतील, समाजात अशी तेढ निर्माण करणे योग्य नाही.
अशी बातमी लेटेस्ट न्युज ह्या वेबसाईट वर पण आलेली आहे



