vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सर्वोच्च न्यायालयात आजचा दिवस ऐतिहासिक, दोन घटनापीठे प्रलंबित घटल्यांवर करणार सुनावणी..

सर्वोच्च न्यायालयात आजचा दिवस ऐतिहासिक, दोन घटनापीठे प्रलंबित घटल्यांवर करणार सुनावणी…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. जवळपास अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यघटनेशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यासाठी दोन वेगवेगळी खंडपीठे (Constitution Bench) नेमण्यात आली आहे. ही खंडपीठे वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. जवळपास अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यघटनेशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर सुनावणी करण्यासाठी दोन वेगवेगळी खंडपीठे (Constitution Bench) नेमण्यात आली आहे. ही खंडपीठे वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत. ज्यामुळे घटेनचा अर्थ लावण्याचे महत्त्वपूर्ण काम ही खंडपीठे करतील. प्रामुख्याने ईडब्ल्यूएस आरक्षणाची वैधता, मुस्लीम आरक्षण, मुस्लिमांमधील बहुविवाहपद्धती, निकाह हलाला आणि इतरही काही प्रकरणांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील संत्तासंघर्षाचे प्रकरणही घटनापीठाकडेच गेले आहे. परंतू, त्यावर आज बहुदा सुनावणी होणार नाही.

 

दोन घटनापीठांपैकी पहिल्या घटनापिठाचे नेतृत्व हे सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचीत न्यायमूर्ती यूयू ललित यांच्याकडे आहे. या खंडपीठात खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एसआर भट्ट, बेला माधुर्य त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या खंडपीठाचे नेतृत्व हे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याकडे असेल. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश आहे

 

देशातील एखाद्या राज्याचे विधिमंडळ अथवा संसद यांमध्ये जेव्हा घटनात्मक पेच निर्माण होतो तेव्हा प्रकरण न्यायालयात पोहोचते. न्यायालयातही काही प्रकरणांमध्ये यावर अनेक न्यायमूर्तींनी विचार करुन निर्णय घ्यावा असे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला वाटते तेव्हा सर्वोच्च न्यायालय अशी प्रकरणे घटनापीठाकडे सोपवते.

संबंधित पोस्ट

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान राम नाईक, राजदत्त, उदय देशपांडे, कुदंन व्यास सन्मानित बाल पुरस्कार विजेता आदित्य विजय ब्राह्मणे मरणोपरांत सन्मानित

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

नवीन कायद्याद्वारे जलद व सुलभ न्याय – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी,मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज,खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी-हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta