vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पतीने पत्नीवर केला 52 जणांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप; उच्च न्यायालयाने म्हणाले, ‘महिला आरोपी होऊ शकत नाही’

पतीने पत्नीवर केला 52 जणांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप; उच्च न्यायालयाने म्हणाले, ‘महिला आरोपी होऊ शकत नाही’

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

या प्रकरणी दिल्लीच्या कर्करडूमा कोर्टाने सान्याविरुद्ध समन्स बजावले आहे. ज्याला त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत महिलेला आरोपी बनवले जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी दिल्लीतील एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. करकरडूमा न्यायालयाच्या निर्णयाला महिलेने आव्हान दिले होते. यामध्ये तिला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली समन्स बजावण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, सान्याने फेब्रुवारी 2008 मध्ये राहुलसोबत लग्न केले. 14 वर्षांनंतर सान्या आणि राहुल यांच्यात मतभेद झाले. याचे रुपांतर हळूहळू भांडणात झाले. 24 ऑगस्ट 2022 रोजी राहुलने पत्नीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. यासोबतच राहुलने सान्याविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम 18, 20, 21 अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता.

राहुलने तक्रारीत म्हटले आहे की, त्याची पत्नी दबंग स्वभावाची आहे. तिचे 52 जणांशी विवाहबाह्य संबंध आहेत. या प्रकरणी दोन प्रेमीयुगुलांची नावेही समोर आली आहेत. राहुलने घरगुती हिंसाचार कायदा 2005 च्या कलम 22 अंतर्गत पत्नीकडून 36 लाख भरपाईची मागणी केली होती.

सान्याने 19 ऑक्टोबर 2022 रोजी पतीविरोधात तक्रारही दाखल केली होती. यात तिने पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच सान्याने भरपाई म्हणून 2 कोटी रुपयांची मागणी केली होती.

प्रकरणी दिल्लीच्या कर्करडूमा कोर्टाने सान्याविरुद्ध समन्स बजावले आहे. ज्याला त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत महिलेला आरोपी बनवले जाऊ शकत नाही. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे निलंबन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम- लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

vishwatmaklokswamivarta

आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्याप्रकरणी  जितेंद्र आव्हाड यांच्याविरूध्द कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध..

टोकियो ऑलम्पिक, नीरज चोपडा याने इतिहास रचला,भारताची जोरदार कामगिरी सुवर्णपदक मिळवले

जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स’च्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन

देशात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; सर्वाधिक रुग्ण, केरळमध्ये 30 हजार 203 नवे रुग्ण सापडले….

vishwatmaklokswamivarta