vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बुलढाण्यात दोन खासगी बसचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 25 ते 30 जण जखमी

 बुलढाण्यात दोन खासगी बसचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 25 ते 30 जण जखमी…

 

बुलढाणा प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यात  मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता,लक्ष्मी नगर उड्डान पुलावर ही दुर्देवी घटना शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लक्ष्मी नगर उड्डान पुलावर ही दुर्देवी घटना शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू आहे. बुलढाण्यात खासगी बसचा अपघात होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

संबंधित पोस्ट

कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा पूर्वतयारीसाठी नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग

ॲग्रिस्टॅक योजनाःशेतजमिन होणार आधार संलग्न-प्रत्येक तालुक्यातील एका गावात सोमवार(दि.९) पासून अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;- जिल्ह्यात 115 उमेदवारांमध्ये लढत तर 72 उमेदवारांची माघार…

vishwatmaklokswamivarta

लखपती दिदी’च्या माध्यमातून मिळेल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*