vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

रब्बी हंगामात 3 लक्ष 36 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन.

रब्बी हंगामात 3 लक्ष 36 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन.

 

 

बुलडाणा, प्रतिनिधी:- जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरी 682.70 मि.मी. पर्जन्यमान झालेले आहे. खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पेरणी 7 लक्ष 35 हजार 831 हेक्टरवर झालेली आहे. तर रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र 3 लक्ष 36 हजार 453 हेक्टरचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली.

 

 

 

रब्बी हंगामातील नियोजन याप्रमाणे : गहू 60 हजार 117 हे., हरभरा 2 लक्ष 25 हजार हे., ज्वारी 20 हजार हे., करडई 1 हजार हे., सुर्यफुल 106 हे., मका 30 हजार हे., तीळ 10, जवस 20 हे., इत्तर 200 हेक्टर असे एकूण 3 लक्ष 36 हजार 453 हेक्टर क्षेत्र लागवडीचे नियोजन आहे.

 

 

 

जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार एकुण लघु प्रकल्प 41 असून संकल्पित साठा 467.99 (द.ल.घ.मी) एवढे आहे. आज रोजी 227.567 (द.ल.घ.मी) एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. या वर्षी अत्यंत कमी पाऊस असल्यामुळे कमीत कमी पाण्यावर येणारे रब्बी पिकांचे नियोजन करण्यात यावे. जसे की, रब्बी ज्वारी, करडई, सुर्यफुल, मका, तीळ, जवस इत्यादी पिकांचे पेरणी नियोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

 

0000

 

संबंधित पोस्ट

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

मौजपुरी येथे जेष्ठ नागरीक आरोग्य तपासणी सह विविध योजनेचे विशेष मार्गदर्शन आणि जनजागृती शिबीर; 253 लाभार्थ्यांना दिला लाभ

vishwatmaklokswamivarta

25 ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी मतदान यंत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू

जपमाळ याविषयी काही महत्वपूर्ण माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री नृसिंहाचे दर्शन

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta