vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महामंडळ मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही- रणनवरे ब्राह्मण समाजाच्या लाक्षणिक उपोषणास मोठा प्रतिसाद दीपक रणनवरे यांच्या अन्नत्याग आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा, प्रकृती खालावली  ..

महामंडळ मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही- रणनवरे ब्राह्मण समाजाच्या लाक्षणिक उपोषणास मोठा प्रतिसाद दीपक रणनवरे यांच्या अन्नत्याग आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा, प्रकृती खालावली  ..

 

राज्य प्रतिनिधी

जालनाः ब्राह्मण समाजाची भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजसेवक दीपक रणनवरे यांनी गत सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून रविवार सकाळी अकरा ते पाच वाजे पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणास समाजबांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरासह संपूर्ण जिल्हा व राज्यभरातून अनेक समाजबांधव यात सहभागी झाले होते.आर्थिक विकास महामंडळासाठी 28 नोव्हेंबरपासून रणनवरे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. गत सहा दिवसांत विविध लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, विविध समाजाच्या संघटना, प्रतिनिधींनी भेट घेऊन ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी ब्राह्मण समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करून महामंडळासह विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

मान्यवरांच्या भेटी

दीपक रणनवरे यांच्या आंदोलनास राजकीय पदाधिकारी व मान्यवर रोज उपस्थिती लावून पाठिंबा देत आहेत. रविवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शहरप्रमुख बाला परदेशी, शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले, नगरसेवक अशोग पांगारकर यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन रणनवरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून पाठिंबा दर्शविला.

 

प्रकृती खालावली

रविवारी सहाव्या दिवशी मुख्य उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांची प्रकृती चांगलीच खालवल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला असून, किडणीवर काही प्रमाणात सूज आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. एकूणच प्रतिकार शक्ती कमी होत असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले.

 

पालकमंत्री अतूल सावे, मुनगुंटीवार, जयंती पाटील, अंबादास दानवे यांनी साधला संवाद

जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे यांनी रविवारी दुपारी उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधून देण्याचे आश्वासन दिले. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगुंटीवार आदींनी दीपक रणनवरे यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली.

आंदोलन सर्व समाजाचे

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी गाव पातळीवर ब्राह्मण समाजाने उद्यापासून उपोषण करावे, आंदोलन करावे, आपल्या तालुक्यातील आमदारांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी विधीमंडळात आवाज उठविण्याबाबत निवेदन द्यावे. माझ्या प्रकृतीची चिंता करू नका, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा झाल्यानंतरच मी उपोषण मागे घेईल, समाज जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरु राहील, हे उपोषण दीपक रणनवरे यांचे नाही तर समस्त ब्राह्मण समाजाचे आहे. माझ्या उपोषणासंदर्भात काही अफवा पसरवली जात आहे, त्यावर समाजाने विश्वास ठेवू नये.

– दीपक रणनवरे

 

आज पत्रकार परिषदेचे आयोजन

अन्नत्याग आंदोलनकर्ते दीपक रणनवरे हे सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सोमवारी दुपारी 1 वाजता गांधी चमन येथील उपोषणस्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

चतुर्वेद शांतीपाठाचे पठण

मुख्य उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या आरोग्यासाठी चतुर्वेद शांतीपाठाचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी हभप नानामहाराज पोखरीकर यांच्यासह शेकडो पुरोहित वर्ग या शांतीपाठासाठी उपस्थित होता.

संबंधित पोस्ट

शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फतमतदानाचा टक्का वाढीसाठी जनजागृती

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

मुंबई ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा…

भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

सामान्य नागरिकांना लवकर न्यायमिळण्यासाठीआवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते-ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न…

डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी निष्णात सरकारी वकील नेमा. तसेच आरोपपत्र दाखल करून पीडिता आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करा,