vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा…

राज्य प्रतिनिधी : राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम असून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत वीज पडून, पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे राज्याच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.

पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी – १५,०९२ क्युसेक, बंडगार्डन बंधारा पुणे – २४,४१६ क्युसेक, भीमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण – ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा – ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून २२,३४५ क्युसेक, सीना नदी – सीना धरणातून २८९ क्युसेक विसर्ग करण्यात आल्याचे राज्याच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बोरघर, वावे, तर्फे, नातू, चिंचवली या रस्त्यांवरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी, अंगणवाडी, पन्हाळे, फणसूर रस्त्या येथील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे.

चिंचगर, कोरेगाव, भैरवी रोडवरील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर-चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे, तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघरमध्ये ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक ३१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

vishwatmaklokswamivarta

अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक हवा- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी   येत्या 7 जूनला बकरी ईद सण आहे. बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. या अनुषंगाने प्रतिबंधित बाबींची माहिती देणारा लेख…

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

मुंबईतील पवई येथे वेब सिरीज च्या ऑडिशन नावाखाली वीस मुलांना डांबून ठेवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या चकमकीत ठार 

vishwatmaklokswamivarta