vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

 

मुंबई प्रतिनिधी “भारतीय सैन्यदलाने काल रात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक एअर स्ट्राइक करून ती सर्व तळे उध्वस्त केली आहेत. ही केवळ एक सैनिकी कारवाई नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा, सुरक्षिततेचा आणि आत्मगौरवाचा बुलंद शंखनाद आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी केले.

   ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे 26 निरपराध हिंदू पर्यटकांची जी निर्घृण हत्या करण्यात आली, तो हल्ला केवळ काही व्यक्तींवर नव्हता. तो हल्ला संपूर्ण हिंदू समाजावर होता, भारताच्या संस्कृतीवर होता. या क्रौर्याचा जो बदला भारतीय सैन्याने घेतला आहे, तो प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या हृदयाला समाधान देणारा आहे.

   सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक कारवाईचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. हे केवळ सूड नव्हे, ही हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी घेतलेली धाडसी पावले आहेत.

   भारतातील हिंदू आता जागा झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मागणीची दखल घेऊन सरकारनेही चोख प्रतिउत्तर पाकिस्तानला दिले आहे. आता जर पाकिस्तानने वेगळी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना यापेक्षा अधिक कठोर उत्तर मिळेल, हे भारतीय लष्कर आजच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

    ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ ही केवळ घोषणा नाही. ती हिंदू समाजावरील अन्याविरुद्धचा हिंदूंच्या एकजुटीचा हुंकार आहे. संपूर्ण हिंदू समाज हा भारतीय सैन्याबरोबर एकजुटीने उभा आहे. श्री. अभय वर्तक,प्रवक्ता, सनातन संस्था

,000000

संबंधित पोस्ट

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात, सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन…

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार,पुढील काही तास धोक्याचे 5 दिवस राज्यासाठी IMDने तीव्र हवामान अलर्ट जारी केले…

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन