vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन उद्योजकांनी दंड व्याजाची रक्कम माफ करुन घेवून कर्जाची परतफेड करावी

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन उद्योजकांनी दंड व्याजाची रक्कम माफ करुन घेवून कर्जाची परतफेड करावी

 

 

 

जालना, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय जालना यांच्यामार्फत सन 1962 ते 1995 या कालावधीत मंडळामार्फत नॉर्मल व सीबीसी कर्ज ग्रामीण उद्योजकांना वाटप करण्यात आले होते. तसेच सन 1995 ते 2001 पर्यंत कन्सोर्टींय बँक फायनान्स या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले. परंतू परतफेड केलेली नाही अशा उद्योजकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून दंडव्याजाची रक्कम माफ करुन घेवून केवळ कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय जालना यांच्यामार्फत विविध योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतू उद्योजकांची आर्थिक स्थिती व आधूनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उद्योग जागतिक स्पर्धेत टिकू शकले नाही. परिणामी उद्योजकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्याकडून कर्ज वसूली वेळेत पुर्ण होवू शकली नाही तसेच काही उद्योजक मयत, परागंदा अन्य कारणामुळे स्थलांतरीत झाल्याने कर्ज वसूली थकीत झालेली आहे. जिल्हा कार्यालयाकडून वारंवार कर्ज वसूलीच्या नोटीस पाठवून कर्ज भरणा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. परंतू अर्थसहाय्यांच्या योजनांना 50 वर्षा इतक्या दिर्घ कालावधी पुर्वीच्या आहेत. त्यांची एकरक्कमी वसूली होण्यासाठी मंडळाद्वारे थकीत मुद्दल व सरळव्याज, मार्जिन मनी एकरक्कमी भरणा केल्यास दंडव्याज माफ करण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.3324

संबंधित पोस्ट

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त,मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार, मदत व बचाव कार्याचा दावोस येथून समन्वय..

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा विभाग-रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी…

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे व बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी*

_शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा दि.4 जुन रोजीहोणारा समारोप समारंभात पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल_*

महाविकास आघाडीचे सरकार पडून राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते. आशिष शेलार