सरकार न्याय केंव्हा देणार – बॅक निवृत्त कर्मचारी संघटना..
( मुंबई प्रतिनिधी )मुंबई- गेली ३० वर्षापासून बँकेचे निवृत कर्मचारी आपल्या पेंशन फंडातील सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा निधी पडून आहे . जो निवृत्ताच्या कामाच्या योगदानातून उभा राहिला आहे . त्या निधीतील रक्कम पेंशनरूपी देण्यात यावी अशी बॅक निवृत्त कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत केली आहे .
या पत्रकार परिषदेत त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले की , गेली ३० वर्षापासून ही न्याय मागणी सरकार दरबारी धूळखात पडली आहे . या न्याय मागण्यासाठी लोकसभेचे आणि राज्यसभेचे जवळपास ४०० खासदारापर्यंत हा प्रश्न मांडला . परंतु सरकारने त्याची अद्यापही दरवल घेतली नाही.
सदर मागणीकडे सरकारने गंभीरपणे दरवल न घेतल्यास हा निधी १० लाख कोटी रुपयापर्यंत जाईल. मात्र, या निधीतील पेंशनधारक पेंशन घेण्यास शिल्लक राहणार नाही . एकंदरीत आमचा जीवन – मरणारचा प्रश्न निर्माण झाला आहे .
विशेषताः सदर संघटनेचे प्रतिनिधी सरकारकडे आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत . परंतु सरकारची उदासिन भूमिका कायम राहिली आहे . आणि सरकारच्या या उदासिन भूमिकेमुळे आतापर्यंत लाखो पेशनधारक पेंशन न घेता या जगात नाही आहे.
आणि सरकारची हिच भूमिका राहिल्यास पेशनधारकांना जीव दिल्या – शिवाय पर्याय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले .