रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) गटाच्या केंद्रीय कार्यालयात महान संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी…
( सुरेश गायकवाड )मुंबई- प्रतिनिधी
महान समाजसुधारक , स्वच्छतेचे प्रणेते , अंधश्रध्देचे कडवे विरोधक संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )गटाच्या केंद्रीय कार्यालयात त्यांची पुण्यतिथी म्युनिसिपल कामगार नेते प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली . त्यावेळेस त्यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दक्षिण मुंबई जिल्ह्याचे सरचिटणीस शिरिषभाई चिखलकर , गुलाब रोकडे, विकास जाधव, दादासाहेब जाधव, वसंत जाधव, एस .व्ही .जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते .
याप्रसंगी प्रकाश जाधव यांनी सांगितले की , संत गाडगे महाराज यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे . त्यांच्या विचारावर वाटचाल केली पाहिजे . त्यांनी स्वच्छतेचा फार मोठा आदर्श समाजाला दिला आहे . याशिवाय अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, रुढी – परंपरा यावर प्रहार करून लोकजागृती केली आहे . त्यामुळे त्यांच्या विचारावर चालणे हेच त्यांच्या पुण्यतिथी निमित्त खरी आदरांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले .