vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मराठवाडा पाणी प्रश्नाबाबत जलसंवादचे आयोजन

मराठवाडा पाणी प्रश्नाबाबत जलसंवादचे आयोजन

जालना : प्रतिनिधी मराठवाडा जलसमृध्दी प्रतिष्ठाण, मसिआ व टीम ऑफ असोसिएशन यांच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृह, मसिआ,छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील पाणी प्रश्न चर्चा व उपाय योजना यावर जलसंवादचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठवाड्‌यातील पाण्याबद्दल प्रेम, आपुलकी व विकासाची भावना असणारे लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, पाणी वापरकर्ते, प्रसार माध्यमे व जलप्रेमी इत्यादींकरीता जलसंवाद आयोजित केलेला आहे. मराठवाडा विभागावर पाण्याविषयी सातत्याने होणारा अन्याय, पाणीटंचाई व पाणी तूट यावर उपाय योजना व भविष्यातील वाटचाल याविषयी सादरीकरण व चर्चा होणार आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपात ५८ टक्क्यांच्या निर्बंधांमुळे जायकवाडी धरणावर होणारा अन्याय, नदीजोड प्रकल्पात कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी, दुष्काळग्रस्त मराठवाड्‌यास १५५ टीएमसी पाणी मिळण्यासाठी ठोस कार्यवाही करणे, धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यासाठी कृष्णाखोऱ्यातून ५१ टीएमसी पाणी स्थलांतरित करणे. हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यासाठी विदर्भातील वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प वाशिमपर्यंत वाढवून दुष्काळी मराठवाड्‌यासाठी येलदरी (१४ टीएमसी) आणि पैनगंगा (१८ टीएमसी) धरणात असे एकूण ३२ टीएमसी पाणी देण्याची कार्यवाही करणे, मराठवाड्याचा सिंचन अनुशेष दूर करणे, सिंचन तज्ज्ञ शंकरराव नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली होणाऱ्या व मराठवाड्यातील पाणी व सिंचन चळवळीला गती व‌ दिशा देणाऱ्या या ‘मराठवाडा पाणी प्रश्न व चर्चा ‘ कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय, उद्योग व्यापार, शेती सिंचन ‌क्षेत्रातील कार्यरत पदाधिकारी, जाणकार, अभ्यासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय लाखेपाटील यांच्यासह मराठवाडा जलसमृध्दी प्रतिष्ठाण, मसिआ व टीम ऑफ असोसिएशन यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे अंध मतदारांना घरोघरी वाटप

गव्‍हाच्‍या साठयावर निर्बंध; दर शुक्रवारी माहिती देणे अनिवार्य..

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर!मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे..

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट-भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार..

नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम*

ठरलं..! व्हॉईस ऑफ मीडियाची जिल्हा बैठक दणक्यात! जिल्हाध्यक्षपदी कृष्णा सपकाळ यांची एकमताने निवड; सुनील मतकर आणि गुलाबराव इंगळे कार्याध्यक्ष….

vishwatmaklokswamivarta