vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उत्तर-पूर्वे हा भाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा ‘कोहिनूर’ – पीयुष गोयल, केंद्रीय मंत्री

उत्तर-पूर्वे हा भाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा ‘कोहिनूर’ – पीयुष गोयल, केंद्रीय मंत्री

 

( सुरेश गायकवाड) प्रतिनिधी

मुंबई- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि ‘स्टुडंट्स एक्सपीरियन्स इन इंटर-स्टेट लिव्हिंग’ (SEIL) या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता यात्रा २०२५ नागरिक अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा दिक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  यावेळेस गोयल यांनी सांगितले की, उत्तर-पूर्व भारत हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले, परंतु अनेकांना या भागाचे महत्त्व अजूनही पुरेसे माहीत नाही. विद्यार्थ्यांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढल्यास देशाच्या विकासाला चालना मिळेल, असे सांगून सरकारने उत्तर-पूर्वेच्या वेगवान विकासासाठी बजेटच्या १०% निधीचे वाटप केले आहे. तसेच, भारत ‘विकसित भारत’ होण्यासाठी उत्तर-पूर्वेचा विकास अनिवार्य असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

   यापुढे त्यांनी असेही सांगितले की, रेल्वे, महामार्ग आणि पूल यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे या प्रदेशाचा झपाट्याने कायापालट होत आहे. आसाम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर यांच्यात बंधुत्वाचा दृढ संबंध आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत उत्तर-पूर्व भारताला ६५ पेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी उत्तर-पूर्व भारताला भेट देऊन त्याचे सौंदर्य आणि संस्कृती अनुभवावी, असे आवाहन त्यांनी केले.

  या वर्षीच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेत २५६ विद्यार्थी सहभागी झाले असून, ते देशभरातील ३२ ठिकाणी प्रवास करत आहेत. ही यात्रा २३ जानेवारीला सुरू झाली असून, १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाचा उद्देश सांस्कृतिक देवाणघेवाण, राष्ट्रीय एकात्मता आणि विविध प्रांतांच्या परंपरा, रीतीरिवाज, भाषा व वेशभूषा यांचे सखोल आकलन वाढवणे हा आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, उत्तर-पूर्व भारतातील ३० प्रतिनिधींनी मुंबईला भेट दिली. त्यांनी येथे संवाद सत्रांमध्ये आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम सांस्कृतिक अंतर कमी करण्यासाठी, परस्पर समज आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पसरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

     या कार्यक्रमाला ABVP चे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, मफतलाल ग्रुपचे अध्यक्ष विशद मफतलाल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आर. डी. कुलकर्णी उपस्थित होते. तसेच, देशभरातील अनेक मान्यवर, विद्यार्थी नेते आणि ABVP सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

भूमी अभिलेख विभागाची 13 व 14 नोव्हेंबर या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील,जवानाच्या वारसांना साडेसात लाख नुकसान भरपाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यासंदर्भात कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta