vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उत्तर-पूर्वे हा भाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा ‘कोहिनूर’ – पीयुष गोयल, केंद्रीय मंत्री

उत्तर-पूर्वे हा भाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा ‘कोहिनूर’ – पीयुष गोयल, केंद्रीय मंत्री

 

( सुरेश गायकवाड) प्रतिनिधी

मुंबई- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि ‘स्टुडंट्स एक्सपीरियन्स इन इंटर-स्टेट लिव्हिंग’ (SEIL) या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता यात्रा २०२५ नागरिक अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा दिक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  यावेळेस गोयल यांनी सांगितले की, उत्तर-पूर्व भारत हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले, परंतु अनेकांना या भागाचे महत्त्व अजूनही पुरेसे माहीत नाही. विद्यार्थ्यांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढल्यास देशाच्या विकासाला चालना मिळेल, असे सांगून सरकारने उत्तर-पूर्वेच्या वेगवान विकासासाठी बजेटच्या १०% निधीचे वाटप केले आहे. तसेच, भारत ‘विकसित भारत’ होण्यासाठी उत्तर-पूर्वेचा विकास अनिवार्य असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

   यापुढे त्यांनी असेही सांगितले की, रेल्वे, महामार्ग आणि पूल यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे या प्रदेशाचा झपाट्याने कायापालट होत आहे. आसाम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर यांच्यात बंधुत्वाचा दृढ संबंध आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत उत्तर-पूर्व भारताला ६५ पेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी उत्तर-पूर्व भारताला भेट देऊन त्याचे सौंदर्य आणि संस्कृती अनुभवावी, असे आवाहन त्यांनी केले.

  या वर्षीच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेत २५६ विद्यार्थी सहभागी झाले असून, ते देशभरातील ३२ ठिकाणी प्रवास करत आहेत. ही यात्रा २३ जानेवारीला सुरू झाली असून, १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमाचा उद्देश सांस्कृतिक देवाणघेवाण, राष्ट्रीय एकात्मता आणि विविध प्रांतांच्या परंपरा, रीतीरिवाज, भाषा व वेशभूषा यांचे सखोल आकलन वाढवणे हा आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, उत्तर-पूर्व भारतातील ३० प्रतिनिधींनी मुंबईला भेट दिली. त्यांनी येथे संवाद सत्रांमध्ये आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. हा उपक्रम सांस्कृतिक अंतर कमी करण्यासाठी, परस्पर समज आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पसरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

     या कार्यक्रमाला ABVP चे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, मफतलाल ग्रुपचे अध्यक्ष विशद मफतलाल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आर. डी. कुलकर्णी उपस्थित होते. तसेच, देशभरातील अनेक मान्यवर, विद्यार्थी नेते आणि ABVP सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.

संबंधित पोस्ट

पाण्याविषयक तक्रारी 1800222309 टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याचे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचे आवाहन

आखाती प्रदेशातील बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने संबंधित सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ग्रंथमहोत्सव’चे रुपांतर आनंदसोहळयात व्हावे-पालकमंत्री संजय शिरसाट‘ग्रंथ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम- महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

vishwatmaklokswamivarta