vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

 

मुंबई प्रतिनिधी-रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरुबाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांना एचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले आहे.

91 वर्षीय कोकिलाबेन यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले असून त्यांना कलिना विमानतळावर पाहण्यात आले आहे. यावेळी अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे चिंतेत पाहायला मिळाले.

मुकेश अंबानीदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. मात्र अद्याप अंबानी कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसंच, हॉस्टिपलकडूनही कोणते बुलेटिन जारी करण्यात आले नाहीये. मात्र सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वाढत्या वयोमानामुळं वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. मात्र कुटुंबाकडून अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न,कोकिलोबेन अंबानी यांचे 1955 साली धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना चार मुलं असून मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर अशी त्यांच्या मुलाची नावं आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत अँटिलियामध्ये राहतात.

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी एआय’ला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर“कृषी समृद्धी योजना” राबविणार- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे· दरवर्षी सुमारे ५००० कोटी तर आगामी पाच वर्षासाठी २५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन,नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत..

vishwatmaklokswamivarta

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीसाठी १३ व १४ रोजी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण