vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

 

मुंबई प्रतिनिधी-रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरुबाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांना एचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले आहे.

91 वर्षीय कोकिलाबेन यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले असून त्यांना कलिना विमानतळावर पाहण्यात आले आहे. यावेळी अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे चिंतेत पाहायला मिळाले.

मुकेश अंबानीदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. मात्र अद्याप अंबानी कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसंच, हॉस्टिपलकडूनही कोणते बुलेटिन जारी करण्यात आले नाहीये. मात्र सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वाढत्या वयोमानामुळं वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. मात्र कुटुंबाकडून अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न,कोकिलोबेन अंबानी यांचे 1955 साली धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना चार मुलं असून मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर अशी त्यांच्या मुलाची नावं आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत अँटिलियामध्ये राहतात.

संबंधित पोस्ट

शिर्डी येथे होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थान तर्फे समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट..

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा– मंत्री गुलाबराव पाटील