vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी  कोकिलाबेन अंबानी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू

 

मुंबई प्रतिनिधी-रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरुबाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांना एचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले आहे.

91 वर्षीय कोकिलाबेन यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण अंबानी कुटुंब मुंबईत पोहोचले असून त्यांना कलिना विमानतळावर पाहण्यात आले आहे. यावेळी अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे चिंतेत पाहायला मिळाले.

मुकेश अंबानीदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. मात्र अद्याप अंबानी कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसंच, हॉस्टिपलकडूनही कोणते बुलेटिन जारी करण्यात आले नाहीये. मात्र सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकिलाबेन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वाढत्या वयोमानामुळं वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. मात्र कुटुंबाकडून अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न,कोकिलोबेन अंबानी यांचे 1955 साली धीरुभाई अंबानी यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना चार मुलं असून मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना कोठारी आणि दिप्ती साळगावकर अशी त्यांच्या मुलाची नावं आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत अँटिलियामध्ये राहतात.

संबंधित पोस्ट

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नवीन डब्ब्यांचे पंधरा ऑक्टोबरला अनावरण.

vishwatmaklokswamivarta

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन· पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांचा लाडका विभाग हा कौशल्य विकास विभाग कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विधान परिषदेत प्रतिपादन..

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta