vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुनरुच्चार, नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे केले आवाहन

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुनरुच्चार, नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे केले आवाहन

राज्य प्रतिनिधी -केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुनरुच्चार, नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे केले आवाहन”आपल्याच देशात बनवलेल्या वस्तू खरेदी केल्याने आपल्या उत्पादकांचे उत्पन्न वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल”: शिवराज सिंह चौहान

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुनरुच्चार करत नागरिकांना देशात तयार झालेली उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथे पीएम-किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता वितरित करताना देशाला स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज पंतप्रधानांच्या या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि एका निवेदनात म्हटलेः

“प्रिय बंधू आणि भगिनींनो, भाच्या आणि भाचे हो , कीटक, पक्षी आणि प्राणी प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो. पण फक्त स्वतःसाठी जगण्याचा उपयोग काय ? आपण आपल्या देशासाठी जगले पाहिजे. देशासाठी जगायचे हेच माननीय पंतप्रधानांनी काल आपल्याला शिकवले. आपल्या घरासाठी फक्त त्याच वस्तू खरेदी करा ज्या आपल्याच देशात तयार होतात, असे आवाहन त्यांनी आपल्याला केले आहे.प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा वस्तू खरेदी करा ज्या तुमच्या गावात, जवळच्या शहरात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या राज्यात किंवा आपल्या देशात कुठेही तयार झालेल्या असतील. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आज आपण जगात चौथ्या क्रमांकावर आहोत आणि लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू आणि 144 कोटी लोकांचा हा देश एक मोठी बाजारपेठ आहे. जर आपण आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूच खरेदी करण्याचा आणि वापरण्याचा संकल्प केला, तर आपल्या शेतकऱ्यांचे, आपल्या लहान-लहान उत्पादकांचे, बचत गटांचे आणि स्थानिक कारागिरांचे- प्रत्येकाचे उत्पन्न वाढेल. आणि जेव्हा त्यांची कमाई वाढेल, तेव्हा आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल.

आपला पैसा परदेशी का जावा ? तो आपल्याच मुलांना रोजगार देऊ दे. मी माझ्या देशासाठी जगेन, आणि तुम्हीही देशासाठी जगा… याचा अर्थ, फक्त ‘मेड इन इंडिया’ उत्पादनेच खरेदी करा. धन्यवाद!

 

***

संबंधित पोस्ट

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील दोन भू-प्रणाम केंद्रांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्‌घाटन…

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

विशेष वृत्त -जालना जिल्ह्यातील 34 रुग्णालये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत मागील तीन महिन्यात 76 रुग्णांना 56 लाख 75 हजार रुपयांची मदत…

सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची आणि गोपनीयतेची शपथ..

vishwatmaklokswamivarta

भारताने राष्ट्रीय रेड लिस्ट मूल्यांकन-प्राणी प्रजातींच्या संरक्षण…!

vishwatmaklokswamivarta

५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta