vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या,बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा

आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या,बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मंत्री श्री. भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

आपले कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्या. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नाही, तर आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी आहे.

शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा.

संबंधित पोस्ट

बॉलिवूड अभिनेता भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांमध्ये असलेल्या सर्व हिंदू समर्थकांना ममता बॅनर्जी यांच्या विरोधात येण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta