vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

 

 सांगली, प्रतिनिधी : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतक‌ऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतु फळपिकांची ई-पिक पाहणी डीजीटन क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी दि. 25 एप्रिल पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा दि. 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना दि. 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सांगली जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. याः विमा कंपनीमार्फत आंबिया बहार सन 2024-25 मध्ये सांगली जिल्ह्यात द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा या फळ पिकांसाठी हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

एमएसआरडीसी’चे रस्ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई क्लायमेट वीक’च्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

vishwatmaklokswamivarta

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत