vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला

फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला

राज्य प्रतिनिधी -फलटण तालुक्यामध्ये दिनांक 24 आणि 25 मे रोजी पडलेल्या अतिवृष्टीमुळे फलटण शहर आणि ग्रामीण भागामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. फलटण शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीला तसेच ग्रामीण भागातील अनेक ओढ्यानाल्यांना पूर आलेले होते

खबरदारीचा उपाय म्हणून फलटण शहरातून शनी नगरभागातून सुमारे 40 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्याशिवाय मौजे खुंटे येथील हनुमान नगर परिसरातून 28 कुटुंबे, मौजे हणमंतवाडी येथील 15 कुटुंबे, मौजे गोखळी पाटी येथील 12 कुटुंबे, मौजे मुरूम येथील 10 कुटुंबे, मौजे सरडे येथील 11 कुटुंबे यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. मौजे सस्तेवाडी येथील एक कुटुंब पाण्याने वेढलेल्या अवस्थेत होते त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दल फलटण येथे दाखल झाले होते. तथापि दल दाखल होण्यापूर्वीच पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सदर कुटुंब सुरक्षित बाहेर पडले.

त्याशिवाय मौजे दुधेबावी आणि मौजे भाडळी खुर्द या दोन ओढ्याच्या मध्ये अडकलेल्या खाजगी वाहनातील परगावातील अंदाजे 50 व्यक्ती (15 महिला व 15 लहान मुले यांच्यासह) यांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनातर्फे यांच्यातर्फे करण्यात आली. तसेच मौजे मिर्ढे आणि मौजे जावली या दोन कोड्यांच्या मध्ये अडकलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्गाच्या बसमधील सुमारे 64 प्रवाशांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय देखील प्रशासनातर्फे करण्यात आली.

संबंधित पोस्ट

आज होणार लोणार येथे योग महोत्सव बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी सहभागी होण्याचे केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवरखर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तरआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार सुरु राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच.

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्क येथे भेट नागरिकांशी संवाद..

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पाच गावांसाठी टँकर मंजूर