vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सातारा प्रतिनिधी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव व दहिवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुकांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे.

 वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. वसतिगृह कार्यालयातून विहीत नमुन्यातील वसतिगृह प्रवेशाचे अर्ज प्राप्त करून घेवून ते हायस्कूल विभागागात 30 जून पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह (मागिल वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दिव्यांग असल्यास दिव्यांग दाखला व अनाथ असल्यास अनाथाचा दाखला इ.) वसतिगृह कार्यालयात सादर करावेत. वसतिगृहात इयत्ता ८ वी. पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रू. २.५० लाख पेक्षा कमी आहे अशा अनु. जाती संवर्गातील विद्यार्थाना गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.

  वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत निवास, भोजन, नाष्टा, दुध, फळे, अंडी, अंथरूण-पांघरूण, शैक्षणिक स्टेशनरी, वह्या व पुस्तके मोफत पुरविली जातात. तसेच प्रवेशितांना दरमहा रू. ५००/- निर्वाहभत्ता दिला जातो. विद्यालय विभागाच्या सर्व व ज्या कॉलेजमध्ये गणवेश सक्तीचा आहे त्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख रक्कम दिली जाते. शैक्षणिक सहल खर्च व जर्नल खरेदीची रक्कम देखील दिली जाते.

0000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव  बैरागी

प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

vishwatmaklokswamivarta

नोव्हेंबर महिन्यातील 8 निवृत्त नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान…

vishwatmaklokswamivarta

नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…