vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे* *शासनाचे धोरण- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे* *पाटील*

*दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे* *शासनाचे धोरण- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे* *पाटील*

सातारा प्रतिनिधी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण असून जिहे कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना(जिहे- कठापूर) उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी राणंद येथील तलावात पोहोचले. याचे जलपूजन जलसंपदा मंत्री श्री.विखे- पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सोनिया गोरे, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

जिहे कठापूर योजनेचे पाणी राणंद तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, दुष्काळ मुक्त करण्यासाठी शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच कोकणातील पाणी समुद्राद्वारे वाया जाते ते पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात येणार आहे, ही योजना येत्या पाच वर्षात पूर्ण होईल.

जिहे कठापूर योजनेचे पाणी साठ हजार हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे. 2029 पर्यंत पाणी संपूर्ण माण व खटाव तालुक्याला मिळेल. ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही व माण व खटाव तालुका दुष्काळ मुक्त करण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले, 2009 साली आमदार झालो. त्यापासून माण खटाव पाणी मिळावे यासाठी उद्दिष्ट निश्चित करून पाठपुरावा केला. त्याचे आज फलित जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणातून आज राणंद तलावात आले. त्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना होत आहे. माझ्या पाठीशी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. त्यांनी पाण्याचे फेरवाटप करून पाणी माण खटावला दिले. त्याचे फलित म्हणून माण खटाव हिरवे गार झाले असून ऊसाचे क्षेत्र हे वाढले आहे. इतर गावांत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सोळशी धरणाचा निर्णयही घेतला पाहिजे तसेच या धरणातून अडीच टीएमसी पाणी या भागाला दिले पाहिजे. तसेच जिहे कटापूर योजनेतील उर्वरित कामांचे टेंडर ही तीस दिवसात काढावे, असेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

जलपूजन कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार . ९ जुलै किंवा १० जुलै होणार असल्याची शक्यता,असल्याची सूत्राची माहिती

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान- केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार- योजनेच्या त्रुटी पुर्ततेसाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

राणे आणि कंबोज यांना नोटीस पाठवण्यापेक्षा बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने बीएमसीला द्यावेत, प्रवीण दरेकरांची मागणी

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांना मुंबईत ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित