vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

टी.बी. मुक्त भारतासाठी “निक्षय मित्र” उपक्रमाअंतर्गत पोषण आहार किट वाटप

टी.बी. मुक्त भारतासाठी “निक्षय मित्र” उपक्रमाअंतर्गत पोषण आहार किट वाटप

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) – कल्याण ग्रामीण तालुक्यातील निळजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. ०५ जुलै, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत “निक्षय मित्र” या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत क्षयरोग (टी.बी.) ग्रस्त रुग्णांना पोषण आहार किटचे मोफत वाटप करण्यात आले.

  या कार्यक्रमात निक्षय मित्र म्हणून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते ८० रुग्णांना पोषण किटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आमदार मोरे यांनी सांगितले की, “टी.बी. सारख्या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारासोबतच संतुलित व पुरेसा आहार अत्यावश्यक आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत या रुग्णांना नियमितपणे पोषण आहार किट देण्यात येणार आहेत.”    “निक्षय मित्र” या उपक्रमातून रुग्णांना केवळ अन्नसुरक्षा मिळत नाही, तर त्यांना समाजाच्या सहानुभूतीचा, आधाराचा आणि प्रेमाचा अनुभव येतो. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये मानसिक उभारी निर्माण झाली असून त्यांनी या सामाजिक भानाबद्दल आमदार राजेश मोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

    या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कल्याण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूनम जयकर यांनी विशेष मेहनत घेतली. निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे, तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत करण्यात आले. आरोग्य केंद्राच्या टीमने रुग्णांच्या नियमित तपासणी, औषधोपचार व समुपदेशन यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या रुग्णांसाठी सातत्याने सेवा पुरवण्याचे आश्वासन यावेळी दिले.  सामाजिक उत्तरदायित्वातून उभा राहिलेला “निक्षय मित्र” उपक्रम म्हणजे समाज आणि रुग्णांमधील विश्वासाचे नाते बळकट करणारा पूलआहे.

00०००

संबंधित पोस्ट

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 3752 लाख समात्राचे वाटप टाट मोहीम गतिमान करण्याचे मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीवर आता कडक निर्बंध परवानाधारक औषधविक्रेत्यांकडूनच विक्री अनिवार्य, केंद्र सरकारचा निर्णय

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

vishwatmaklokswamivarta

० ते १८ वयोगटातील मुलामुलींची आरोग्य तपासणी होणार जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम..