vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

मुंबई/ प्रतिनिधी:वडाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने १९९३ सालच्या दंगली प्रकरणातील ३२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला कौशल्यपूर्ण तपास व शोध मोहिमेद्वारे अखेर अटक केली आहे. आरीफ अली हशमुल्ला खान (वय ५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलीस आयुक्त बृहनमुंबई, देवेन भारती यांच्या सूचनेनुसार शहरात पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत बंदर परिमंडळातील वडाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने सन १९९३ मधील दंगलीप्रकरणी भा.दं.वि. कलम १४१, १४३, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, ३०७ नुसार दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा कसोशिने शोध सुरू केला.

आरोपी आरीफ खान गेली अनेक वर्षे गायब होता. त्याचा कोणताही ठावठिकाणा उपलब्ध नसताना पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मूळ गावात जाऊन माहिती मिळवली. त्यातून मिळालेल्या सुगम मार्गाचा मागोवा घेत मुंबईतील अँटॉप हिल आणि दिनबंधू नगर झोपडपट्टी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या साहाय्याने सापळा रचून अखेर ५ जुलै रोजी दिनबंधू नगर येथून आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला तत्काळ न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) विजयकांत सागर यांनी वडाळा पोलीस ठाण्याच्या पथकाला बक्षीस देऊन गौरविले आहे.ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (का. व सु.) सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक) अभिवन देशमुख, पोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वडाळा विभाग) विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर, सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस उपनिरीक्षक सौरभ मुसळे, शरद खाटमोडे, पोहवा कासार, दहिफळे, पो.शि. कलाने, चौधरी, वलेकर, शेलार व मखरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बंदर परिमंडळात पाहिजे व फरार आरोपींच्या शोधासाठी मोहिम सुरूच असून, यापुढेही अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.  

राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्तअंबरनाथ मधील महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नियोजनाबाबत विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

vishwatmaklokswamivarta

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.