vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लेखक विरेंद्र संघवी लिखित पुस्तक How to earn more money तरुणांसह उदयोग जगतासाठी वरदायी ठरणार

लेखक विरेंद्र संघवी लिखित पुस्तक How to earn more money तरुणांसह उदयोग जगतासाठी वरदायी ठरणार

     मुंबई / प्रतिनिधी’ How to earn more money या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक उद्योगपती विरेंद्र संघवी यांनी नवउदयोग करणाऱ्या तरुणांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात तरुणांनी, उद्योगपतींनी एकाच उद्योगात अडकून न पडता वेगवेगळे उदयोग केले पाहिजे. एवढेच नव्हें तर स्वतःला झोकून दिले पाहिजे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही.

या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने अजय पोपट, महेंद्र कोठारी, नर्गीस गौर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम मरीन लाइन्स येथील बहाई समाजाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.

 हल्दीराम,पतंजली, अमूल प्रसिद्ध अशा उत्पादनाचा दाखला देत ह्या उत्पादनाचा अधिक लाभ कसा घेता येईल याचा ही विचार होणे गरजेचे आहे.

     विरेंद्र संघवी हे गेली ४८ वर्ष आपल्या कार्याशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी केलेले कार्य सर्व तरुणांसाठी वरदान ठरले आहे. आणि आताही था पुस्तकातून तरुणांनी आकाशात उंच झेप घेण्यासाठी सरसावले पाहिजे तरच जगण्याला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा हे काही जगणे आहे का? असा प्रश्न सारखा सतावित राहिल. जसे कि, जगविख्यात प्रेरणादायी लेखक स्वेट मॉडॅन यांचे pushing to the Front ह्या पुस्तकाची निर्मित्ती करून त्यावेळच्या तरुणांना आणि सध्याच्या तरुणांना प्रेरणास्थान ठरले आहे तसेच प्रेरणास्थान लेखक विरेंद्र संघवी हे देखील तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

    लेखक विरेंद्र संघवी यांनी सांगितले की, समाजसेवा, शिक्षण, गृहनिर्माण, आरोग्य या विषयावर कशाप्रकारे खर्च करता येईल याचा विचार होण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागात ही जैविक शेती, दूध उत्पादन, पेटींग, डिझाईन मार्केटिंग आदी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

  एकंदरीत पाहता लेखक विरेंद्र संघवी यांना विविध सामाजिक, व्यावसायिक कामाच्या योगदानाबद्दल १०० हून अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या स्वतःच्या कंपनीत ७००० इंजिनिअर विविध विषयाच्या योजनावर कार्यरत आहेत.

    लेखक विरेंद्र संघवी यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळेपण दडलेले असते. आणि तीच त्याची ओळख असते ही ओळख ओळखल्यास प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळे करून दाखवेल एवढ मात्र निश्चित.

संबंधित पोस्ट

पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे व श्रीमती लता एकनाथ शिंदे यांचे Enumeration Form आज भरून घेण्यात आले.

नमुंमपा पदभरती परीक्षेमध्ये दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी दिली परीक्षा…

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

शेतमजूर युनियन लालबावटा यांचा विधवा व निराधार महिला यांच्या मागण्या साठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन चा मोर्चा …

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

vishwatmaklokswamivarta