vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा पदभरती परीक्षेमध्ये दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी दिली परीक्षा…

नमुंमपा पदभरती परीक्षेमध्ये दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी दिली परीक्षा…

       नवी मुंबई प्रतिनिधी-   ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ प्रक्रियेच्या आजच्या दुस-या दिवशी 12 जिल्हयांमधील 28 केंद्रांवर एकुण 21000 उमेदवारांनी परीक्षा दिली असून संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडली.

 गट – क आणि गट – ड मधील 30 संवर्गातील 668 पदांकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 28 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात येणा-या या परीक्षा प्रक्रियेवर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग 1 श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तसेच 29 अधिकाऱ्यांची केंद्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सकाळी 9 ते 11 वा. या पहिल्या सत्रात 6223 उमेदवारांनी परीक्षा दिली.

दुपारी 1 ते 3 वा. या दुसऱ्या सत्रात 6234 उमेदवारांनी परीक्षा दिली.

सायं. 5 ते 7 वा. या तिसऱ्या सत्रात 5985 उमेदवारांनी परीक्षा दिली.  अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेतील दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.  पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 21115 उमेदवारांनी परीक्षा दिली असून दुस-या दिवशीही 18442 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. या दोन्ही दिवसाच्या परीक्षा प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडल्या असून पुढील दोन दिवसांच्या परीक्षांचेही तशाच प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे. परीक्षा प्रक्रीया सुरळीतपणे पार पडली असून यापुढील तिन्ही दिवसांच्या परीक्षा प्रक्रीयेचे अशाच प्रकारे सुयोग्य नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांनी सांगितले आहे.    परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पाठविण्यात आलेली असून त्यांनी ती डाऊनलोड करुन घ्यावीत आणि आपले प्रवेशपत्र घेऊन परीक्षास्थळावर प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रात नमूद वेळेवर उपस्थित न राहिल्यास उमेदवारांना नियमानुसार परीक्षेस बसता येणार नाही याची प्रत्येक उमेदवाराने गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावयाची आहे.नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार काटेकोरपणे होत असून उमेदवारांनी नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी केली जात असल्यास उमेदवारांनी दक्ष रहावे व स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक कोणत्याही भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेविषयी अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

vishwatmaklokswamivarta