vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याचा वापर करावे. बदलत्या हवामान परिस्थिती आणि बाजारातील बियाण्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता, स्वतःचे बियाणे जपून ठेवणे ही शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची बाब ठरत आहे. सर्व शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी घरच्या बियाण्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

घरच्या बियाण्याचे फायदे : बाजारातील महागड्या बियाण्यांचा खर्च टाळता येतो. स्थानिक हवामान व जमिनीस अनुरूप बियाण्यांची उगमशक्ती चांगली राहून गुणवत्तेबाबत सुनिश्चिता असते. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर शेती करता येते. स्थानिक, पारंपारिक व दुर्मिळ वाण टिकवता येतात.

बियाणे साठवताना योग्या काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्याची उगवण क्षमता व किडींपासून सुरक्षित राहण्यासाठी निरोगी व रोगमुक्त झाडांपासूनचे बियाणे निवडावे, बियाणे नीट स्वच्छ करून, त्यातील ओलावा पूर्णपणे काढून वाळवावेत. बियाणे हवाबंद डबे, पोती किंवा मातीची भांडी यामध्ये कोरड्या, थंड व अंधाऱ्या ठिकाणी ठेवावेत. किंड नियत्रंणासाठी कडुलिंबाचा पाला किंवा राख याचा वापर करून नैसर्गिक संरक्षण करावे. बियाण्यांवर वाणाचे नाव व साठवण्याची तारीख लिहा.

प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होईल.

00000

संबंधित पोस्ट

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमाचे आयोजनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा तेलतुंबडे-आंबेडकर यांची विशेष उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारींचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश**नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश; एसडीआरएफ पथके तैनात*

कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील !

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..