vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याचा वापर करावे. बदलत्या हवामान परिस्थिती आणि बाजारातील बियाण्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता, स्वतःचे बियाणे जपून ठेवणे ही शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची बाब ठरत आहे. सर्व शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी घरच्या बियाण्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

घरच्या बियाण्याचे फायदे : बाजारातील महागड्या बियाण्यांचा खर्च टाळता येतो. स्थानिक हवामान व जमिनीस अनुरूप बियाण्यांची उगमशक्ती चांगली राहून गुणवत्तेबाबत सुनिश्चिता असते. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर शेती करता येते. स्थानिक, पारंपारिक व दुर्मिळ वाण टिकवता येतात.

बियाणे साठवताना योग्या काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्याची उगवण क्षमता व किडींपासून सुरक्षित राहण्यासाठी निरोगी व रोगमुक्त झाडांपासूनचे बियाणे निवडावे, बियाणे नीट स्वच्छ करून, त्यातील ओलावा पूर्णपणे काढून वाळवावेत. बियाणे हवाबंद डबे, पोती किंवा मातीची भांडी यामध्ये कोरड्या, थंड व अंधाऱ्या ठिकाणी ठेवावेत. किंड नियत्रंणासाठी कडुलिंबाचा पाला किंवा राख याचा वापर करून नैसर्गिक संरक्षण करावे. बियाण्यांवर वाणाचे नाव व साठवण्याची तारीख लिहा.

प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होईल.

00000

संबंधित पोस्ट

पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार! व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांचा शब्द; जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक पत्रकारांना मिळाले विम्याचे गिफ्ट…

vishwatmaklokswamivarta

सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे

वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक…

vishwatmaklokswamivarta

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

डोंगरी महोत्सव कालावधीत चोख पोलीस राहणार एसटीच्या जादा बसेस सोडणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

vishwatmaklokswamivarta