vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर.

 

राज्य प्रतिनिधी-राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान!
सिल्लोडमध्ये केळणा नदीच्या पुरामुळे २ सामाईक बस अडकल्या; सोयगावमध्ये सर्व्हिस पूल वाहून गेला, तर कन्नडमध्ये पूर्णा नदीला महापूर! प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा!

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली. सध्या धरणाचे ४१ पैकी ४ गेट पूर्णपणे उघडण्यात आले असून ३२ गेट २ मीटरने उघडले आहेत. तापी नदीपात्रात सध्या १,८५,८२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे.त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद!बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मलकापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे

“यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! १ हजार ३९६ हेक्टर पिकांचे नुकसान तर ८२ घरांची पडझड; पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४० नागरिकांना प्रशासनाने दिले जीवदान, बळीराजाकडून तातडीच्या मदतीची मागणी!

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. पावसाचा जोर ओसरल्याने बहुतांश राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक पुन्हा सुरू झाली असून काही मार्ग वगळता जनजीवन सुरळीत होत आहे.गडचिरोली शहरातील सखल भागात साचलेलं पाणी काढण्यासाठी नगर परिषदेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सीबीच्या सहाय्याने नाले आणि पाण्याचा प्रवाह मोकळा करून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरू नये, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू.

 

संबंधित पोस्ट

लाडक्या बहिणींच्या अनुदानातील कपात थांबवा नसता तीव्र आंदोलन छेडणार – कैलास गोरंटयाल

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला कळमनुरी-वसमत उपविभागाचा आढावा

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *प्रयागराज कुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदू एकता पदयात्रा’ *कुंभमेळ्यामध्ये घुमला ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष!

vishwatmaklokswamivarta

पश्चिम आशियाई संकट: महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल… सर्वं राष्ट्रहितार्थम्…सर्व काही राष्ट्रासाठी..