
बिहारमधल्या पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, १५ जिल्ह्यांमधले ४८ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित…
राज्य प्रतिनिधी-बिहारमधल्या पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, १५ जिल्ह्यांमधले ४८ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत.
१३ मदत छावण्यांच्या माध्यमातून १२ हजारांहून अधिक नागरिकांना निवारा, अन्न आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मदतकार्यासाठी एक हजार ६८८ नौका, एसडीआरएफची २७ आणि एनडीआरएफची १० पथकं तैनात केली आहेत.



