vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

बुलढाणा, प्रतिनिधी : भारतीय डाक विभाग आपल्या सेवा प्रणालीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘आय.टी. 2.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत एपीटी (APT) अप्लिकेशन ही नवीन डिजिटल प्रणाली कार्यान्वित करत आहे. या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे डाक व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार असून, यामुळे पोस्ट ऑफिसमधील सेवा आणखी सक्षम होणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाखा टपाल कार्यालये व उपडाकघरांमध्ये ही प्रणाली मंगळवार दि. 5 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात येत आहे. या संक्रमणासाठी आवश्यक असलेल्या डेटाच्या स्थलांतराची प्रक्रिया सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी पार पडणार असल्याने त्या दिवशी (दि. 4 ऑगस्ट रोजी) बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाची कामे 4 ऑगस्टपूर्वीच पूर्ण करावीत, जेणेकरून व्यवहारात अडथळा येणार नाही, अशी माहिती अधिक्षक डाकघर, बुलढाणा यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

0000000

संबंधित पोस्ट

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे *पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद,एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले

vishwatmaklokswamivarta

रोटी क्लब मुंबई डिस्टिक 31 41 आयोजित आनंदोत्सवामुळे ज्येष्ठांकडून जाहीर आभार

देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

vishwatmaklokswamivarta

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावा, कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश – नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना