vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

*जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

राज्य प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व बँक खातेधारकांनी आपल्या जन धन खात्यांचे ‘री-केवायसी’ (Re-KYC) आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आयोजित शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री. विजय कुलकर्णी यांनी केले आहे.हे अभियान भारत सरकारचे वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशानुसार १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू आहे. रायगड जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात ३ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या उपस्थितीत झाली.

*शिबिरात उपलब्ध सुविधा*जिल्ह्यातील सर्व बँकांकडून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये बँक ग्राहक खालील सेवांचा लाभ घेऊ शकतील:जन धन खात्यांचे ‘री-केवायसी’ (Re-KYC): पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेल्या जन धन योजनेच्या खात्यांना दहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ‘री-केवायसी’ करणे अत्यावश्यक आहे. या शिबिरात हे काम केले जाईल.

प्रधानमंत्री जनसुरक्षा योजनांची नोंदणी:प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी नवीन नोंदणी करणे

*विशेष मेळाव्याचे आयोजन*या अभियानाअंतर्गत शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल स्कूल, आमटेम येथे एका विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी साकव प्रकल्प संस्था पेण मदत करणार असुन त्यांच्या माध्यमातून पाबळ खोरे मधील कोंढवा, वरप, जिर्णे मधील आदिवासी लोकांची जनधन खाती तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सामावून घेतले जाणार आहे यासाठी नागोठणे आमटेम पाबळ खोरे आणि पेण तालुक्यातील सर्व लोकांनी तसेच बँक ऑफ इंडियाच्या सर्व ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.गावांमध्ये शिबिरे कधी होणार आहेत याची माहिती जवळच्या बँक शाखेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले

0000000

संबंधित पोस्ट

माओवाद विरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश-किमान तीन वर्षे सी-६० मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण 

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ – मंत्री आदिती तटकरे

शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्‌घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*

राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश