vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

        सांगली, प्रतिनिधी : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 18 ऑगस्ट 2025 या सात दिवसांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करणे ही अन्न व्यावसायिकांची जबाबदारी आहे. तपासणीदरम्यान कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न रावसाहेब समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.

   सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जाणार असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय – पालकमंत्री शंभूराज देसाई कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपिता यांचा सत्कार

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी 21 जुलैपर्यंत मुदत..

रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा महाड येथे 3 नोव्हेंबर रोजी होणार.. 

vishwatmaklokswamivarta

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजन

vishwatmaklokswamivarta