vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

        सांगली, प्रतिनिधी : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दि. 11 ते 18 ऑगस्ट 2025 या सात दिवसांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करणे ही अन्न व्यावसायिकांची जबाबदारी आहे. तपासणीदरम्यान कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न रावसाहेब समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.

   सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जाणार असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

धुळे जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या कोणत्याही लाभार्थ्याची चौकशी नाही – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर…

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…

प्रा. लक्ष्मण हाके यांनी जीआर फाडला खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल..

vishwatmaklokswamivarta

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta