नवी मुंबई द प्रतिनिधी):- राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे
समितीचे अध्यक्ष व सदस्य दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वा., चेतना कॉलेज, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालयाजवळ, सर्व्हे नं. 341, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई – 51 येथे भेट देणार आहेत.
समितीच्या भेटीसाठी वेळ मागण्यासाठी काय करावे?दि. 15 ते 23 सप्टेंबर 2026 दरम्यान आपले लेखी निवेदन/सूचना/अभिप्राय किंवा भेटीसाठी वेळ मागणारे पत्र खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सादर करता येईल:
1) प्रत्यक्ष: अपर जिल्हा उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 9 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) मुंबई 400 051 वेळ: सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:30
2) ई-मेल:konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.inकोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
उच्चस्तरीय समितीचा शासन निर्णय (GR): https://drive.google.com/file/d/1oj9Oio9Kn95_35fAFT98LaJx0eclHYVW/view